Friday, 9 January 2015

आशेचा किनारा कधी संपतो का रे?
कधीच नाही ना..
एक आशा येते..तुझी..
मग येते सोबतीची,
मग येते स्वप्नांची,
अलवार कवटाळतो ना आपणही..
नाहीतर कसली धांदल होते इवल्याश्या मनाची.
आता यासोबत
आपल्याला कुणी साथ दिली तर..
दिल को सुकून....
नाहीतर फरफट नुसती..एकट्याची..
कश्यासाठी हि जन्म घेते पण आशा?
खरंतर आशे शिवाय मिळालेलं
प्रत्येक सुख वाऱ्यासारखा असतं मुक्त..
पण हि मनशृंखला...
आशेवरच विणते स्वप्नाचा झरा..
आणि नवीन,तरल पालवी फुटते तिला..
कोरी आशा..धडका तर बसतात पण..
हृदयाला फेटाळून लावणारी 'मतवाली आशा'.


Thursday, 8 January 2015

To b treted good..my b the only hunger of the huaman being in all the world.isnt it?
काही लोक नुसती पोस्ट वाचून आनंद घेत silent राहतात,कॉमेंट करण्याचा त्रास करून घेत नाही.आपल्याला काही आवडतं तर सांगितल्याने दुसऱ्यालाही समाधान मिळते हे कळते पण वळत मात्र नाही..

Wednesday, 7 January 2015

मन सज्जना!


भर भर भरकटनाऱ्या विचारांना...
कितीही लगाम घालायचा प्रयत्न केला ना,
तरी तंद्री लागतेच....
त्यांना काही काळ वेळ नसतो.
विषय लागत नाही,
तिथे कुणी उगाच टीका करणारा नसतं.
आपल्या मनाचे आपण राजे असतो,
खूपचं भारी असतं असं आपलंपण..नाही का?

Monday, 5 January 2015

एक वाट सरळ जाते
पुढली वाट दिसत नाही,
नजरेआड असणाऱ्या असंख्य वाटा
पुढे फुटत असतील..
न जाणे कोण कोण तेथे भेटत असतील.
आपली वाट आपण निवडतो,निवडू शकतो..
चुकली वाट तरीही आपण स्वतः 
तिज वळवू,वळवू शकतो..
का करावा शोक चुकल्या हिशोबांचा..
आपण आताहि जिंकू, जिंकू शकतो

Tuesday, 9 December 2014

मन सज्जना!



अशी एका व्यक्तीची कमी..
दुसऱ्या व्यक्तीशी बोलून थोडीच भरते.
व्याकुळता कमी होत नाही..
तडफड कमी होत नाही.
जीवात जीव नाही..आणि 
डोळ्याला डोळा नाही.
प्राणापलीकडे जाऊन जीव लावणं..
म्हणजे शाप असतो..मन सज्जना!

Monday, 8 December 2014

नेमकी जे सुटते
 तेच आपल्याला हवे असते..
Aslelya gostinkade aple
Janivpurvk durlaksh aste.

Thursday, 4 December 2014

थरथरनाऱ्या ओठावरही
नाव तुझेच जपले.
गमले मलाही नाही
देह-भान कसे हरपले.
जितेपणी जगाला,
अस्तित्वही खटकले.
विझताच चिता..'वेड्यास'
वाह वाह करत परतले.

Sunday, 19 October 2014

ज्या दिवशी ऑफिसला खूप उशीर होतो त्याच दिवशी नेमकी बसचा पास संपतो..मग पुन्हा त्याला चार्ज करयाला १०-१५ मिनिटे उशीर झाला कि डोक्यावरचा लाल दिवा लागलेलाच असतो.पण एरव्ही स्वतः चा वेळाही न पाळणारे सहकारी डोळे मोठे करतात..चारदा उशिरा येण्याचे कारण विचारून भंडावून सोडतात.कसं ना? वेळेआधी पोहचलं किंवा वेळेत पोहचलं तर यांना पित्त होतं वाटतं. तेव्हा त्यांना काही घेणं देणं नसतं.खरंय ना?
इति ऑफिसमय नमः
आपल्या नकळत आपल्याल्या भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आपल्या आयुष्यातल्या बदलात सहभाग असतो ...आठवा बरं...

Pages