Sunday 9 May 2010

दिवस ...

दिवस येतात...दिवस जातात.आठवणींचे शिंतोडे मागे मात्र सोडून जातात.घरासमोरच गवत मात्र..डोलात वाढत असतं...वाढणाऱ्या वयाची जाणीव  ते करून देत असत.डोळे उघडून पाहिलं तर सतत काहीतरी बदलत असत.आपण मुद्दाम पाहत नाही  म्हणून आपल्याला ते दिसतहि नाही.ऊन-पाऊस,वादळ-वारा..निसर्ग त्याचे खेळ चालू ठेवतो.आपण मात्र आयुष्याची सांगड घालण्यात  सदैव मग्न असतो..भरपूर प्रवास झाल्यावर अचानक लक्ष्यात येत...अरे..कधी झाल हे सगळ..काल तर आपण तिकडे होतो..काही काळ धक्का लागल्यासारख आपण जरी वागत असलो.तरी पुढच्याच क्षणी भूत आणि भविष्याशी सांगड मात्र घालता असतो.वर्तमानकाळ दुर्लक्षितासारखा बाजूला असला.. तरी रुसत मात्र नाही.कारण तोच  वेषांतर करत असतो...प्रत्येकाच्या मनात डोकावण्यासाठी.. 

2 comments:

  1. wonderful to read u!!
    keep writing!!

    ReplyDelete
  2. Nice one Asmi!!
    Aathvani ha aaplya aaushyatala asa part aahe ki..jo shevatparyant aaplyabarobar asto..nobody can separateit from us.It always keeps us to live happily in all difficulties and sorrows.

    ReplyDelete

Pages