Thursday 9 September 2010

स्वैर

मी जितका जीवनाला जाणायचा प्रयत्न  केला ...तितकंच ते मला गूढ वाटत गेलं.
मनुष्याला गूढ गोष्टीत निसर्गताच ओढ असावी असे वाटते.खरच हे जीवन नावच कोडं म्हणजे...कुठलीतरी न संपणारी ओंळ आणि आपण त्याला पूर्णविराम देण्यासारखच  झालं कि.विचार असे  स्वैर असतात हे मला मी लिहायला लागल्यावर जाणवायला लागलं.मोठमोठ्या महापुरुषांनी आणि संतानी त्याला अतिशय सोप्या पद्धतीने व्यक्त करायचा  प्रयत्न केलाय. पण म्हणून कोणी त्यावर विचार करणं थांबवत का? नाही मला नाही वाटत असं मी ह्या कोड्याला उलगडण्याचे सगळे प्रयत्न करत असते.निसर्गाच्या कुठल्या कुठल्या गोष्टीवरून अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असते.पण काही काळानंतर जाणवते कि हे विचार विकारात बदलत चाललेत ..मग मी पूर्णपणे थांबवते.अर्थात काही काळापर्यंतच..तुम्ही काय करतात?

1 comment:

  1. मला असा वाटते कि आपल्या विचारातूनच कृती घडत असते आणि ते पण नैसर्गिकच असत
    त्यामुळे ते थांबवायला नको कारण नैसर्गिक गोष्टी नैसर्गिकरीत्याच घडू द्याव्या
    आणि मी काय करते तर माझ्या नैसर्गिक विचारातूनच आयुष्याला समजून घ्यायचा प्रयत्न करते आणि आनंदाने जगते

    ReplyDelete

Pages