Sunday 14 March 2010

आठवणी आणि बालपण या माझ्या दोन आवडत्या गोष्टी.बालपणीच्या आठवणीत मी मनसोक्त रमते.आणि बरेचसे मला आठवतेही.त्या खूप सुखद असतात आणि हास्यास्पदही..............मनाला तजेला देऊन जातात बरच वेळ आठवल्या कि.बालपणच्या आठवणीत अल्लडपणा,रडणं,आणि बऱ्याचदा कोरीव घटना साठवलेल्या असतात.आज इतके  वर्ष पूर्ण होऊनही  त्याच जुन्या गोष्टी आठवल्या कि नव्या भासतात.आत्ताच घडल्यासारख्या......चित्रपटाच्या फितीसारख्या डोळ्यासमोर फिरताये असे भास होतात कित्येकदा....

Thursday 11 March 2010

हितगुज




आभालाला नसतो किनारा
तसा कर्तुत्वालाही नसतोच तो
आयुष्य हे गनितासमानच भासत,
जस गणित बरोबर सोडावल
तर उत्तरही बरोबर येत...
अनुभव हे खुप काही शिकवतात
ते जीवनमूल्य देतात,
आणि त्यांचा मागोवा घेतच
आपण जगतो..

ध्येयाने प्रेरित पक्ष्याला हव तरी काय?
भरभरून उड़न्यासाठी मोकळ आकाश
जिथे नसतो भेदभाव समाजाचा
नसतात बंधने जाती, पंथ अन धर्माची..

मानवाला हव तरी काय..
दोन शब्द प्रेमाचे,
मायेचे, ओलाव्याचे, धीराचे.
त्यातूनच पार पडला म्हणजे,
उडतो मग आभाळअत स्वच्छंदी
पण कित्येकदा करून घेतो
आपणच किनारा आभालाला
आणि आखतो सीमा
कर्तुत्वाच्याही !!

त्या कर्तुत्वाला न आखता
मनाला आखाव्यात,
भावनेचा पूर पाहून
गेल्यावर
सिंहावलोकन करताना...
मागे पाहिल्यावर मग,
समाधान वाटत..
आयुष्यात खुप काही कमवल्याच.

Wednesday 10 March 2010

शाप




               ते क्षण तेव्हाचे,
           झेलता मला आले नाही.
             दुःख माझेच होते,
         पण पेलता मला आले नाही.


        साऱ्या गोष्टीचा बाऊ होऊन,
       त्या मला हसून चिडवतात.
        माणूस असून सारे काही,
          करता तुला आले नाही.

     निसर्ग आणि देवही हसतो,
     माझ्या अश्या शांततेवर.
      सारे काही देऊनसुद्धा,
   आनंद लुटता तुला आला नाही.

     उसळतात मग लाटा जेव्हा,
    तरीही मी शांतच असते.
    चंद्र मिश्कील हसून बोलतो,
शाप माझा होता हेही सांगता तुला आले नाही.

चारोळी!

निसर्गाच्या नियमांना,
फार कमी  अपवाद असतात.
अन अपवाद म्हणून खरं तर ,
त्यांनाच फार नियम असतात.

Pages