Thursday 3 March 2011


तू असशील रे धुरंधर..
मी आहे मग कलंदर..
थोडं अंदर,थोडं बाहर..
तुझाच आहे जंतर-मंतर


कालच तुझ्यासाठी मी ..
केला नवस कबूल..
तुझ्या डोळ्यात लागली जेव्हा मला..
दुखः ची चाहूल.
तुझे भिरभिर होणे
अन  कातर पाऊल
मला कळेना माझी अशी ..
काय झाली भूल..


कालही तुझ्या त्या चलाखीने..
ढळली होती माझी नाव..
हि मीच कि खचूनही..
शोधून काढला माझा गावं

स्वतः च मुळ विसरलेला व्यक्ती...
वरवर खोट पांघरून घेऊन जगत असतो.
त्याच्या मते पांघराल्यानेच फक्त..
त्याचा "वाल्मिकी" होत असतो.


तू हमी दिलीस म्हणून
खात्रीने पावलं पुढे टाकली
अंधारलेली माझी खोली..
तेव्हा प्रकाशमय वाटली.

कालही मजला..छळून गेला..
लबाड..भयंकर..तुझाच वारा.
कालही विनाकारणच  मग..
वाहत गेल्या अश्रू धारा..

समुद्राच्या एक एक लाटेवर
मांडून येते दुःख सारी..
अन हसून रडते जेव्हा जेव्हा
सांडून येते ओझी भारी..

मोजताच नाही हिशोब आता मी
तू दिलेल्या घावांचे..
अजूनही अस्तित्व जाणवते मला
तू दिलेल्या श्वासांचे..

Pages