Friday 11 March 2011


खरं तर आपली सगळी प्रश्न..
आपल्यापासून सुरु होतात.
अन नाईलाजाच्या  नावाने..
उत्तर बनून सुटून जातात.

आपण असाह्य असलो कि,
रागवायचा अधिकार आपल्याला राहत नाही.
आणि रोषाचा ज्वालामुखी मग,
भडभडा वाहायचा थांबत नाही.

Wednesday 9 March 2011


कुणाची का वाट पहावी...
जो सुखवेल मनाला?
आपण ते सगळं करावं...
जे रिझवेल आपल्या मनाला.

पुढे चालून गेल्यावर..
मागे यायला नकोसं होतं.
म्हणून आधीच वेचून घ्यावं..
जे आपल्याला हवंसं होतं.

रागानंतरच्या मौनापेक्ष्या
त्याआधीचं मौन बरं...
नंतरच्या त्या भयाण शांततेत..
वेड लागतं हे खरं...


कालचा निग्रह कालच मोडलेला..
आजचा दिवस  मात्र....
त्याच्याशी विनाकारण जोडलेला..

Sunday 6 March 2011


आज तुझी ती गोंधळलेली
निष्पाप पापणी सांगून गेली..
कशी कशी तू..नाव टिकवली..
अनेक तुफाने तारून नेली.

निर्ढावलेल्या मनासारखे...
निर्ढावलेले शब्द...
तरी मला आस तुझी..
आणि मी अशी स्तब्ध.

माझ्या मौनातच सापडेल..
अर्थ तुला सारा..
गरज आहे फक्त मला..
 तुझं मान जरा..

माझं त्याच्यासाठी
असं आसुसलेलं होणं अन..
त्याचं ते शांतपणे
त्याच्यातच हरवलेलं राहणं

Thursday 3 March 2011


तू असशील रे धुरंधर..
मी आहे मग कलंदर..
थोडं अंदर,थोडं बाहर..
तुझाच आहे जंतर-मंतर


कालच तुझ्यासाठी मी ..
केला नवस कबूल..
तुझ्या डोळ्यात लागली जेव्हा मला..
दुखः ची चाहूल.
तुझे भिरभिर होणे
अन  कातर पाऊल
मला कळेना माझी अशी ..
काय झाली भूल..


कालही तुझ्या त्या चलाखीने..
ढळली होती माझी नाव..
हि मीच कि खचूनही..
शोधून काढला माझा गावं

स्वतः च मुळ विसरलेला व्यक्ती...
वरवर खोट पांघरून घेऊन जगत असतो.
त्याच्या मते पांघराल्यानेच फक्त..
त्याचा "वाल्मिकी" होत असतो.


तू हमी दिलीस म्हणून
खात्रीने पावलं पुढे टाकली
अंधारलेली माझी खोली..
तेव्हा प्रकाशमय वाटली.

कालही मजला..छळून गेला..
लबाड..भयंकर..तुझाच वारा.
कालही विनाकारणच  मग..
वाहत गेल्या अश्रू धारा..

समुद्राच्या एक एक लाटेवर
मांडून येते दुःख सारी..
अन हसून रडते जेव्हा जेव्हा
सांडून येते ओझी भारी..

मोजताच नाही हिशोब आता मी
तू दिलेल्या घावांचे..
अजूनही अस्तित्व जाणवते मला
तू दिलेल्या श्वासांचे..

Tuesday 1 March 2011


चूरगळलेल्या पानाचं भविष्य
त्याच्या चूरगळंण्यातच कमी होतं.
अन माणसाचं भविष्य....
धुंद उतरल्यावर अचानकच दिसतं

Pages