Monday 2 February 2015

जिवापलीकडे प्रेम केलं कि जिवापलीकडच्या जखमाही होतात...

Wednesday 21 January 2015

मना सज्जना !



काही भावना कितीही वेदनादायक असल्या
तरी त्यांना अंत नसतो.
प्रश्न बनूनच उरतात....उत्तर समोर तरंगत असते.
पण सुटत नाही.
मग काही वाटा भरकटून जातात 
अनाथासारख्या आणि बेघर देखील 
आणि शेवटी त्यातल्याच 
लढा करत सुटतात अखंडपणे..मुक्तीसाठी..

Saturday 10 January 2015

अशी प्रत्येक भावना शब्दात चपखल बसते का?
अश्या कितीतरी भावना अनाथ होऊन नुसत्याच येरझाऱ्या घालतात पण शब्दांच्या मोहमयी जाळ्यात अडकून बसत नाहीत.त्या फक्त डोळ्यांनी टिपून अलगद कुरवाळायच्या असतात.

Friday 9 January 2015

तुझा सतावनं संपत नाही..आणि माझा वाट पाहणं संपत नाही..तशी मला घाई नाहीच...होऊन जाऊदे तगडा लढा...
आशेचा किनारा कधी संपतो का रे?
कधीच नाही ना..
एक आशा येते..तुझी..
मग येते सोबतीची,
मग येते स्वप्नांची,
अलवार कवटाळतो ना आपणही..
नाहीतर कसली धांदल होते इवल्याश्या मनाची.
आता यासोबत
आपल्याला कुणी साथ दिली तर..
दिल को सुकून....
नाहीतर फरफट नुसती..एकट्याची..
कश्यासाठी हि जन्म घेते पण आशा?
खरंतर आशे शिवाय मिळालेलं
प्रत्येक सुख वाऱ्यासारखा असतं मुक्त..
पण हि मनशृंखला...
आशेवरच विणते स्वप्नाचा झरा..
आणि नवीन,तरल पालवी फुटते तिला..
कोरी आशा..धडका तर बसतात पण..
हृदयाला फेटाळून लावणारी 'मतवाली आशा'.


Thursday 8 January 2015

To b treted good..my b the only hunger of the huaman being in all the world.isnt it?
काही लोक नुसती पोस्ट वाचून आनंद घेत silent राहतात,कॉमेंट करण्याचा त्रास करून घेत नाही.आपल्याला काही आवडतं तर सांगितल्याने दुसऱ्यालाही समाधान मिळते हे कळते पण वळत मात्र नाही..

Wednesday 7 January 2015

मन सज्जना!


भर भर भरकटनाऱ्या विचारांना...
कितीही लगाम घालायचा प्रयत्न केला ना,
तरी तंद्री लागतेच....
त्यांना काही काळ वेळ नसतो.
विषय लागत नाही,
तिथे कुणी उगाच टीका करणारा नसतं.
आपल्या मनाचे आपण राजे असतो,
खूपचं भारी असतं असं आपलंपण..नाही का?

Monday 5 January 2015

एक वाट सरळ जाते
पुढली वाट दिसत नाही,
नजरेआड असणाऱ्या असंख्य वाटा
पुढे फुटत असतील..
न जाणे कोण कोण तेथे भेटत असतील.
आपली वाट आपण निवडतो,निवडू शकतो..
चुकली वाट तरीही आपण स्वतः 
तिज वळवू,वळवू शकतो..
का करावा शोक चुकल्या हिशोबांचा..
आपण आताहि जिंकू, जिंकू शकतो

Tuesday 9 December 2014

मन सज्जना!



अशी एका व्यक्तीची कमी..
दुसऱ्या व्यक्तीशी बोलून थोडीच भरते.
व्याकुळता कमी होत नाही..
तडफड कमी होत नाही.
जीवात जीव नाही..आणि 
डोळ्याला डोळा नाही.
प्राणापलीकडे जाऊन जीव लावणं..
म्हणजे शाप असतो..मन सज्जना!

Pages