Sunday 5 September 2010

झाल्या हजार जखमा अन शोषिले इतके..

झाल्या हजार जखमा अन शोषिले इतके,
तरीही नाद सुटे ना त्या बेकार अपेक्ष्यांचा.

जाळून राख झाली  कधीच अस्तित्वाची,
तरीही अर्थ लागेना या गूढ जीवनाचा.

मी मलाच केली शिक्षा कित्येकदा,
तरीही सुटता सुटे ना हा गुंता परस्परांचा.

सवाल कसले?मी पाठपुरावाच केला,
तसा आदेशच होता  मला, माझ्याच भावनांचा.

चालली नाव कोठे ?..वल्हे कधीच पडले,
नुरले न गाव माझे अन मागमोस किनाऱ्याचा.

Pages