Monday 28 February 2011

अबोल राहता..छळंते मजला ..
माझेच एकएकटेपन..
असा कसा रे..तू वेगळा.?
माझ्यात न उरते माझेच "मी " पण.
..

ओळख होताच दोन दिसातच मग..
नवीन ओळख... जिवलग होतो.
चार आठवड्यात कडी तुटते..
अन तोच जिवलग मग शोषक होतो..

आणाभाका..वचन सारी...
 नुसतीच..नावापुरती...
आयुष्य सरत नाही..
त्या शपथा आणि शब्दांवरती

तुझ्यापासून दूर अगदी दूर
जायचा मी ठरवलं..अन..
पुढच्याच क्षणी नकळतच
माझं पाऊलं तुझ्याच दिशेनं वळलं

तुझ्यावर रुसायला मला फार आवडतं
हे तू जाणून आहे..मग कुठे खटकत?
रुसण दूर राहत जेव्हा तूझा "मी" पणा आड येतो.
जसा किनारा तहानलेला..पाण्याशिवाय दूर आसुसलेला राहतो .

Sunday 27 February 2011


काळ सुद्धा तुझंच चुकलं,
पण तू ते स्वीकारलं नाहीस.
माझ सगळं खरं असूनही,
मलाच तू फेटाळलसं.


वाहत्या पाण्याला म्हणे..
वाहण्यासाठी..फक्त दिशा लागते.
आणि थकलेल्या मनाला...
सांभाळून घ्यायला एक नाजूक वाट लागते.


"काल" सुद्धा आजही डोळ्यात
अगदी स्पष्ट तसाच आहे.
त्याचचं नशीब वाईट..
त्याचा काळच तसा आहे.



माझ्या डोळ्यात अश्रूचा
एक थेंबही त्यांना नको होता.
असे त्यांचे अति लाड नाही,
प्रेमाचाच तो एक प्रकार होता.

लिहायचं म्हटलं
कि खूप सारा गोंधळ होतो.
लिहायला खूप सुचतं
फक्त हात जरा कमी पडतो.


काल बाबांनी चुकलं म्हणून,
पाठीत धपाटा घातलेला.
आणि काही क्षणात,
चेहरा त्यांचा काळजीने दाटलेला.


बाहेर मनाला शीतलता देणारी..
स्वच्छ,सुंदर पहाट.
मागचं काहीच आठवत नाही,
आठवतो तो फक्त "आज".

सांडलेलं चांदणं,
झेलायचच राहून गेलं.
आज कळतये,
किती जगायचं राहून गेलं.

Friday 25 February 2011


तुझी गरज असते मला
हे जाणून आहे तुही..
म्हणूनच रागवतो नेहमी..
उगाचच कारण नसूनही..

किती हायसं..वाटतं..
तू आसपास असला कि
नाहीतर श्वास सुद्धा जड होतात..
तू माझ्यावर रुसला कि.

Saturday 19 February 2011


कसा तुझा खोटेपणाचा..
घडा कधीच भरत नाही..
कित्येकदा ठरवते तुला सुधरावायच..
तरीही मला ते जमत नाही.

जुन्या मैत्रिणीच्या आठवणीत..


सुकलेल्या आठवणीना..
नुसताच ओले झाल्याचा भास..
आज किती दूर आपण..
तरीही दरवळतो आहे आठवणीचा सुवास.

Friday 18 February 2011



डोळ्याच्या किनारयातून तू कधी शिरलाही नाही.
अन मनाच्या रिक्त पोकळ्या कधी तू भरल्याही  नाहीस.
नुसताच वाऱ्यासारखा  जवळ आलास...अन
खोल अंतकरणात शिरून नशा बनुन उरलाहि नाहीस..

काल तुझ्यावतीने मी स्वतःच..केसात कुरवाळीले..
कालही मोगरयाला दुरूनच न्याहाळले..
शोधले तुला कुठे कुठे नाही..?
शांत पाण्यालाही मी चाळवले..

ये जरा बरसून ये...खूप सरी घेऊन ये..
सोडून ये पाश सारे..मुक्त जरा होऊन ये.
मला हवाहवासा तो नशा बन..आणि मोगरा होतात घेऊन ये..
आता येताना माझा फक्त माझ्यासाठीच होऊन ये.


Monday 7 February 2011

शब्द कसे भिरभिर होऊन नाचतात
नको असले तरी वाहतात..
प्रश्न सुटत नाही तरीही
ते अचानक संपतात..थिजतात.

Sunday 6 February 2011

तुझी चाहूल लागली असेल त्याला..
म्हणून नाटक करत असेल..
रंगमंच नाही लागत त्याला....
विचारलेलं सगळं खोटं असेल.

~~Being confidance to others is best than being doubt.

Saturday 5 February 2011

~~People sometimes use the phrase"In this big world" & sometimes use"Small world"..what is the world exactly?:)
~~It is just you,who have everything...:)
~~More u think more u will go mad....
~~If u are getting all which you are planned then u r best! If nt check your willpower & strategies!
~Truth of life is just belive urself and make as strong as u can..
~~U finds me philosophical i.e. because u just failed to uderstand my emotions.
I am happy to make century of my blog.Thats was just because of my papa's dream i have been continually writing poems and my thoughts.These days i really don't feel to write anything.But because of God's  gift i can write everything and on every topic.Although i don't want to write it.I am very happy that i am successful in writing.I will devote all my writing to my parents and if possible i will write always. Celebrating this day!Happy Century.   

Friday 4 February 2011


जाणार कुठे?..
येणार आहेस पुन्हा माझ्याकडे..
असली कटकट घेणार कोण..
आपल्याकडे?

आणि पाऊस हो.....मुसळधार.


आता तू पाऊस हो..
अन मनाला  ओलं चिंब कर.
कोरडं झालेलं हृदय जरा....
त्याचा अंगण ओलं कर..

शब्द शब्द माझा तू..
तू कविता हो...अन
बसून जा कोपऱ्यात...
 मनाच्या माझ्या.म्हणजे..तुझ्याच त्या..

तू फुंकर हो..कानापाशी ये..
हळूच उब बनून शहाराहि हो..
माझ्या केसात हात फिरव
थोडी रंगतदार स्वप्न सजव..

याआधी झालेलं सगळं विसरून जा.
खरच...मनापासून जमलं तर ..जीव लाव..
तू मला आवड्तोसाच..
तुही कर पर्यंत आवडून घेण्याचा..
 आणि पाऊस  हो.....मुसळधार..

आता तू पाऊस हो..
अन मनाला  ओलं चिंब कर.
कोरडं झालेलं हृदय जरा....
त्याचा अंगण ओलं कर..

फरक तुला जाणवेलच
तुझ्या वागण्याचा माझ्या वागण्यावर
तू विसरलास बहुदा..
मी तुझाच आरसा रे..
कालचा तुझा चेहरा वेगळा
आजचा जरा बरा आहे.
काल लख्ख काळोख होता..
आज हवी असलेली पहाट आहे.

Thursday 3 February 2011


माझ्या अश्रूंची किंमत..
त्यांच्या मते शून्य आहे.
इथेच कळत ना त्यांच्यासाठी
मी किती नगण्य आहे....


तुझ्याकडून अपेक्षा करायच्या नाहीत..
असं लाख बजावते स्वतःला.
पण पुढच्याच क्षणी..
स्वप्नांच जाळं लागते मात्र विणायला

काल रात्रभर मी नुसतीच
कूस बदलत राहिले..अस्वस्थ होऊन..
तू मात्र झोपला होतास..
परक्यासारखा शांत पडून.

चार चार ओळीनी,
मन फक्त भरत असं...
आयुष्याच्या गीताचं...
पाहिलं कडवं म्हणावं जसं.

Wednesday 2 February 2011


बोलून टाक तूच आधी
एक घाव-दोन तुकडे कळेल तरी एकदाचं.
"ती" तुला सांगयला येणार नसेल आधी...पण
हसायला कारण आपणच असतं शोधायचं.

Tuesday 1 February 2011


मी घाबरत नाही खंर तरं..
माझ्यातही लखः प्रकाश आहे "वेगळं करण्याचा".
फक्त थोडा विश्वास डगमगला होता..
तो जगापुढे मांडण्याचा.
हात कापला काय..आणि काळीज कापून दिलं काय..
लोकांना त्याची कदर नसते.
आपल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीवर.. 
त्यांची वटवाघुळाची नजर असते.

गुलमोहोर बघण्याची सवय
नंतर इतकी सुटली होती...
कि जेव्हा मला स्मरण झाले..
त्या जागेवर फक्त त्याची एक काठी होती.

चांगलं वेगळं केलं कि..
लोकं पाय खेचत राहतात..
म्हणूनच अशी स्वप्न फक्त..
कवितेतच सुरक्षित राहतात.

बोलायला खूप सोपं असतं,
असं आयुष्याचं तत्वज्ञान.
प्रत्यक्षात आयुष्यात बघावा लागतो..
कित्येकदा आपला मान-अपमान.


कविता म्हणजे काय ...
गंमत नसते जोडशब्दांची.
शब्द शब्दात झळकणारी,
प्रतिमा असते मनाची.

फुलपाखरासारखं आयुष्यही,
भरभर बदलत जातं.
कालचा दुःख सुद्धा मग,
आजच्या प्रश्नांनी विरुण जातं.

नाईलाजात म्हणे कुठेतरी..
इलाज असतो दडलेला.
तोच आपल्याला दिसत नाही..
म्हणून नाईलाज असतो पडलेला.

Pages