Thursday 30 September 2010

असंच

अंधारात हात फिरवले कि ते कुणालाही लागत असतात.

म्हणून आपण तसं करत नाही.

अंधारची आस कुणाला असते?उजेडाचे स्वप्न पाहणारयास नक्कीच नसते.

अंधारत शोधूनही सापडत नसतात रस्ते अनोळख्याला.

किती आपण जपून ठेवतो आपल्या सगळ्या अनमोल क्षणांना.

स्वप्न सुद्धा कशी गिरगीटासारखी असतात.पूर्ण झाल्याचे उसासे सोडताच पलटून जातात.

आपल्या नकळ आपल्या सोबत अनेक दुवे असतात.

रस्यावर चालतांना अनके चेहरे दिसतात.

ध्येय असूनही नसल्यासारखे आपण कावरे बावरे होतो.

प्रत्येकाच्या आयुष्यात असा क्षण येतो.

कितीतरी स्वप्न मनात घर करून असतात.

काही पूर्ण होतात काही पुन्हा जाऊन बसतात.

आपण स्वप्ने पाहतो कारण त्यांना अर्थ असतो.

वाहत्या पाण्यालाही एक प्रवाह असतो.

आपण पाण्यासारखं वाहत राहायचं असतं अर्थपूर्ण.

आणि मनसोक्त जगायचं अंधाराकडे न जाता..

प्रत्येक क्षण...निखळ,निर्व्याजी,नशिला.

Pages