Wednesday 9 March 2011


कुणाची का वाट पहावी...
जो सुखवेल मनाला?
आपण ते सगळं करावं...
जे रिझवेल आपल्या मनाला.

पुढे चालून गेल्यावर..
मागे यायला नकोसं होतं.
म्हणून आधीच वेचून घ्यावं..
जे आपल्याला हवंसं होतं.

रागानंतरच्या मौनापेक्ष्या
त्याआधीचं मौन बरं...
नंतरच्या त्या भयाण शांततेत..
वेड लागतं हे खरं...


कालचा निग्रह कालच मोडलेला..
आजचा दिवस  मात्र....
त्याच्याशी विनाकारण जोडलेला..

Pages