Tuesday, 11 March 2014

आपल्याकडे परदेश आणि परदेशातल्या लोकांवर टीकाच जास्त होते. अर्थात मीहि त्याला अपवाद नव्हते. खरं तर हि लोकं काही वेगळी नसतात. संस्कृतीचा फरक असल्याने आपल्याला त्यांच्या काही गोष्टी खटकतात. आणि तश्या त्यांना देखील आपल्या गोष्टी खटकतच असतात. हे माझ्या इथल्या आत्तापर्यंतच्या वास्तव्यावरून आणि स्वानुभवावरून सांगत आहे . सिडनीत ४ वर्ष्यापुर्वी जेव्हा मी आले तेव्हा खूप भांबावलेली होती . बऱ्याच मेहनतीने आणि घरातल्या बसून कंटाळल्याने मी नौकरी शोधण्याचा निर्णय घेतला आणि मला संधी मिळाली. "The Smith Family" च्या मुख्य शाखेत मुख्य विभागात 'मानव संसाधन प्रशासक 'अर्थात ' Human Resource Administrator 'म्हणून निवड झाली. आनंद होता पण खूप ताण होता . आणि इतक्या मोठ्या संस्थेत काम करण्याचा अर्थात नौकरीचाच हा पहिला अनुभव. घाईघाईत माझ्या सोबतीनेच दोन स्त्रिया..ललना  लिफ्ट मधे आल्या. "Hi! Good Morning !" म्हटल्या. अनोळख्या व्यक्तीने स्मितहास्याने अशी चौकशी करणं माझ्यासाठी नवीन असल्यानी मी भांबावली पण दचकत हे"Gm" केलं. पुढच्याच क्षणी "You are late ?"असं विचारलं मी अजूनही तिच्याकडे विचारात बघतच होते ती पुन्हा म्हटली "Because you look nervous " मी म्हटलं "Yes I guess It's my first day here " तिखट मिरची झोंबावी तशी ती ओरडली,"o oo.. Good luck & have a nice day!" मी आपलं "Thank you " म्हटलं. तशी ती हातातल्या ड ब्ब्याकडे बघून म्हटली," whats in your launch box ?you can exchange with my sandwich ?"मी म्हटलं,"That's spicy veg rice" आणि माझा मजला आला म्हणून मी तिला निरोप दिला डब्बा दिला नाही ;)पण नकळत मनावरचा तन गेला. अनोळख्या शहरात अनोळख्य व्यक्तीकडून मिळालेल्या शुभकामनेने मनाला अर्थातच दिलासा मिळालं . तसं…. आपल्याकडे ओळख नसतांना साधा स्मितहास्य देखील मिळणं अवघड असतं. असा त्या क्षणी मला जाणवलं. आणि खरचं लिफ्ट असो कि साधं रस्त्यावरून आपण वाटसरूला बाजूला होऊन दिलेल्या वाटेला हि लोकं भले दिलसे स्मित हास्याने धन्यवाद देतात किंवा सलग शिंका येतांना रेल्वे मध्ये बाजूला बसलेली व्यक्ती जेव्हा ,"are you ok ?" विचारते किंवा साधं बाळासोबत रेल्वेमध्ये जातांना 'pram ' उचलतांना जेव्हा मदतीचे ४ हात समोर येतात किंवा उभे असतात जागा देतात.तेव्हा अनोळख्या माणुसकीची वेगळीच झलक डोळ्यासमोर येते.

अस्मिता 
आपण देवावर श्रद्धा ठेवतो,
काही ठिकाणी अंधश्रद्धाही म्हणतो .
आणि जिथे तर्क लागत नाही,
तेव्हा त्याला नियती म्हणतो. 

Tuesday, 4 March 2014

वळणानंतर वळण येते
आणि मार्ग लागतात सुटायला .
खूप संयम लागतो नाही ना?
प्रत्येक वाट सहजतेने  वळायला . 

Thursday, 27 February 2014

दैनंदिन जीवनात साधा एक बदल केला तरी किती बदलते न आयुष्य?पण बदल स्वीकारायला आपण कुरबुर करतो मग एक असो कि अनेक नाही का?

आजची कविता

आजपण तिने कागद हाती घेतला टेबलवरच्या पेनाकडे थंड नजर टाकली विचारच्या तंद्रीत बडवून घेतले स्वत:ला खुपसे मतले सुचले खुपसे किस्से आठवले खुपसे खर्डे झाले - मनातच ... मैफिलच जमली जणू काहींनी डोळ्यात पाणी आले काहींनी हसून गाल दुखले काहींचे वाचन झाले काहीना टाळ्या मिळाल्या तिचं समाधान झालं ती उठून जायला निघाली पेन उचलला नाही एकही अक्षर लिहिले नाही कागद कोराच राहिला टेबलवरचा कागद वाऱ्यासोबत कधी उडून गेला तिला कळालेही नाही मनाचा कागद मात्र खच्च भरलेला आजच्या कवितेने तिने आजही कविता लिहिली स्वत:साठी कुठलाही पुरावा मागे न ठेवता !!

Friday, 22 November 2013

कसं ना ?

आठवणीने लक्षात ठेवायचं
तर हमखास विसरलं जातं.
आणि ठरवून विसरायचं,
तर भुंग्यासारखं डोक्यात राहतं .

चावी हरवू नये म्हणून,
जागेवरच ठेवते मी.
निघतांना कुणास ठावूक
जागाच अचानक विसरते मी.

कसं  ना ?
आठवणीने लक्षात ठेवायचं
तर हमखास विसरलं जातं.

वाढदिवस लक्षात राहतो ,
नेमकी त्याच दिवशी विसरते मी .
आणि उशिरा फोन केल्याबद्द्ल
आधीच  माफीही मागते मी..

कसं  ना ?
आठवणीने लक्षात ठेवायचं
तर हमखास विसरलं जातं.

आता माझ्या लक्षात होतं ..
नक्की काय काय मांडायचं मी.
 सुरवात जोमात केली पण
आता जाम विसरलीच हो मी . :(

कसं  ना ?
आठवणीने लक्षात ठेवायचं
तर हमखास विसरलं जातं.

कागदपत्र  असो कि पुस्तकं ,
मी अचूक लक्षात ठेवते जागा.
गरजेच्या वेळी मात्र
माझाच माझ्यावर होतो त्रागा .

कसं  ना ?
आठवणीने लक्षात ठेवायचं
तर हमखास विसरलं जातं.

आता वय झालं म्हणू नका ,
अजून सोळाच …जास्त नाही.
कालच कुणीतरी विचारलं तेंव्हा ,
वयाचं पक्कं आठवलं नाही .:) :)

कसं  ना ?
आठवणीने लक्षात ठेवायचं
तर हमखास विसरलं जातं. 

Monday, 4 November 2013

ऑटम

"ऑटम" …. पानगळतीचा  ऋतू… कधीचा नुसता डोक्यात भुंग्यासारखा घुसलाय. हसताय काय?साधा सुधा नाही हं
… बाहेर पडलं कि या बहरलेल्या मनमोहक वृक्षांकडे बघून तर तो सारखा मी काहीतरी व्यक्त करायचं ठेवलाय त्याबद्दल असा सारखा हिशोब काढत असतो. तसा त्याला संपून अगदीच काही वेळ नाही झाला असे मला वाटत असते….अगदी तो पुन्हा यायची वेळ येईपर्यंत…. म्हणजे कदाचित हा ऋतू आपल्याला जाम आवडतो असाच आहे बहुदा. याच्या नुसत्या नावानेही आपल्या डोक्यात सळसळ होते… अन गळून पडलेली ती लाल,पिवळी पानं ढिगाढिगाने हजर होतात . तरी मी कित्ती टाळलं होतं मला त्याला लिहीत बसायचं नाही पण… आता अगदीच राहवत नाही. एकदाची त्यालाही मुक्ती द्यायला पाहिजे नाही का?हो … नाही पण अख्खा मोसम हि कसली डोलतं असतात वृक्षावर.आणि जातांना धरतीला अस्तित्वाने सौंदर्य त्यागून जाणं म्हणजे महानतेची सीमाच नाही का?पण ती वाळकी पानं आणि रिक्त सुकेलेल्या फांदीचे एकटेपण पाहून वाईटही वाटते अन नव्या बहरची चाहूलही. कसली गंमत नाही का?खेद तोही आल्हाददायी पानगळतीचा आणि हुरहूर,प्रसन्नता,चाहूल नव्या पालवीची... नव्या सुरवातीची,भरभराटीची. असोत…. पण मानवाचे आयुष्य देखील असेच नाही का?जन्म,पालवी,उत्साह ,भरभराट अन पुन्हा पानगळती… "आम्ही चालतो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा". नाही जास्त गंभीर नका होऊ.ते आपला हा 'ऑटम ' ह्याच संदर्भाची जाणीव करून देण्यास पाठलाग करीत होता बहुदा माझा म्हणून म्हटला एकदाचं व्यक्त करावं म्हणजे मुक्ती त्यालाही अन मला समाधान त्याला 'ती' दिल्याची. पण त्या अव्यक्त,संमिश्र भावना या सुखद आहेत मलातरी. तुम्हालाही बहुदा तश्याच असतील हो ना ?

Sunday, 3 November 2013

लहानपण देगा देवा! 1

                                                 भाग १
  वय वर्ष … किती ते विचारू नका.पण  आता नक्कीच लहान नाही मी. ठेवलं  आहे लहाण  ती वेगळी गोष्ट.
 असोत. तश्या बऱ्याच आठवणी आहेत माझ्या बालपणाच्या…प्रत्येकाच्या  असतात. चांगल्या आणि वाईटहि . चांगल्या बघु कारण  माझ्या चांगल्याच आहेत.दादा म्हणजे माझे वडील माझे आदर्श अर्थात "हिरो "होते . समाजसेवक असल्याने घरात  सतत गजबज. आणि कुठ्ल्या कुठल्या संस्था तसेच समाजसेवेच्या दृष्टीने होणाऱ्या सभा आणि संमेलनात त्यांचा सततचा समावेश असे.मी घरात लहान असल्याने आणि मोठी भावंड त्यांच्याच अभ्यासाच्या व्यापात असल्याने माझी जबाबदारी त्यांच्याकडेच  असे. मग बाजारहाट म्हणा कि इतर काही. तसं एकदिवस एका महत्वाची बैठक अर्थात "मीटिंग " चालू होती. घरातच होती.त्यावेळी बहुदा मी ६ वर्ष्याची असावी.. दिवसभर खेळून दमलेली मी बिचारी....  दादांजवळ "मीटिंग " मध्ये जाऊन बसली. अजूनही स्पष्ट आठवते मला पाय भारीच दुखत होते. आणि हे असे दुखले म्हणजे आई किंवा दादा दाबून द्यायचे माझे पाय . भारी मज्जा होती बघा. अहाहा  काय वय होतं ते… अहम-अहम म्हणजे बरं वाटतं न आपली कुणी अशी सेवा म्हणजे काळजी  म्ह्णते हो मी केली तर …. नाही तर तुमचा आपलं काहीतरीच अर्थ काढाल ह . असो… आता पाय दाबून घ्यावेसे वाटत होते. दादांचं आपलं काहीतरी महत्वाचं मुद्दे मांडणं चालू होतं. आता ???हे  पाय दुखणं कसं थांबवणार?आई तर स्वयंपाक करते. आणि तिला इतक्या लोकांचं खाणं-पिणं करायचं होतं. बाजूला बसलेल्या माझ्या लाडक्या 'कर्डिले'बाबां कडे मोर्चा वळवला. "बाबा !पाय खूप दुखताये दाबून द्या न…." क्षणभर मीटिंग मधेही शांतता. कारण बाबा खरचं बाबा होते. म्हणजे  वयाने फार मोठे आणि मीटिंगचे  कदाचित अध्यक्षच…. आठवत नाही इतके आता . "सोन्याबाई दाबतो हं जरा इकडे वळवा  पाय माझ्या दिशेने " म्हणून .. पाय दाबले त्यांनी माझे चक्क . ह्या मोठ्या २०-२५ लोकांच्या सभेत अगदी न चिडता. मीटिंग चालू होती नंतर पण तेव्हा मला काय झाला खी समजला नव्हतं. इतकं नक्कीच आठवतं कि असल्या पाय दाबनं सेवेनंतर मी निद्रा देवीची आराधना केली लगेचच. 
               त्यानंतर बऱ्याचदा मला माझ्या दादांनीहि आणि खुद्द बाबांनीही या प्रसंगाची आठवण कित्येकदा करून दिली. अर्थात विनोदाने .दादा व इतर मंडळीस त्या गोष्टीचा हेवा वाटे.पण मला त्याची अजिबात जाणीव नव्हती. आज मला हा प्रसंग जेव्हा जेव्हा आठवतो तेव्हा-तेव्हा मला खजील झाल्यासारखे वाटते.लहानपणी एक सोपी म्हण सतत लक्षात असे,"मोठेपणा हा वयावर अवलंबून नसून तो कर्तुत्वावर अवलंबून असतो." बाबांचं असं वागणं हा खरा मोठेपणा नाही का ?नाहीतर त्यांनी देखील त्यांच्या वयानुसार आणि पदानुसार मला हटकून लावलं असतं हो ना ? या  आठवणीवरून एक गोष्ट थेट हृदयाला भिडते आणि मनाला 'माणूस' म्हणून सतत जाणीव करून देते माणसाचा मोठेपणा,विनम्रपणा हा त्याच्या 'डीग्री' वर अवलंबून नाही तर साधेपणावर आणि पुढ्यात आलेली गोष्ट सहजपणे निभावून नेण्यात आहे हेच खरं  नाही का?
ठरवलेलं तेव्हा तेव्हा.. 
 गड सहज पार केला. 
काही ठिकाणी फक्त.. 
ठरवायचं  तेवढं राहून गेलं.:)

Thursday, 1 August 2013

मुझको भी तरकीब सिखा यार जुलाहे!

       गुलझार म्हणजे इंदधनुष्य.एक एक गझल असली कातील आणि खोल अर्थपूर्ण. त्यापैकी मुझको भी एक तरकीब सिखा  दो म्हणजे फार विचार करायला लावणारी शब्दरचना. 
मुझको भी तरकीब सिखा यार जुलाहे
अकसर तुझको देखा है कि ताना बुनते
जब कोइ तागा टुट गया या खत्म हुआ
फिर से बांध के
और सिरा कोई जोड़ के उसमे
आगे बुनने लगते हो
तेरे इस ताने में लेकि
इक भी गांठ गिराह बुन्तर की
देख नहीं सकता कोई
         विणताणांचा धागा जोडणं किती सोपं आहे.खरचं एकही गाठ बघण्यास चांगली देखील वाटत नाही.रोजच्या  आयुष्यात आपल्याला ह्याच्यासारखं जमतच कुठे?ते सामान्य माणसाचं काम नव्हेच.त्यासाठी उच्च कोटीचा समजूतदारपणा लागतो. साधा गोष्टीवरून मन उदास झाले कि डोक्यात असंख्य विचारप्रवाह चालू होतात.आई म्हणते,"कुठल्याही गोष्टीने वाईट वाटलं कि मन पोखरून काढण्यापेक्षा पक्षासारखं वागावं. पाऊस आला तरी पंख झटकून पुन्हा उडता आलं पाहिजे.अवघड असलं  तरी अशक्य नक्कीच नहि." अर्थात हे मी काढलेले अर्थ.प्रत्येकाचा थोडाफार वेगळा असू शकतो.तुम्ही काय काढलात तेही नक्की सांगा  आई म्हणा किंवा हा विणकर एकच गोष्ट  सांगताय हे खंर. आपणही पुन्हा पुढला धागा विनण्याचा  आणि पंख झटकून भारी घेण्याचा १००% प्रयन्त करुया.आणि आपणहून तरकीब काढूया. हो ना ?

Pages